पुणे,नाशिक,नगरमध्ये गारपीट,आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी |Havaman Andaj Today

Spread the love

Havaman Andaj Today

नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.राज्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,नगरमधील पारनेर आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवड,निफाड,येवला,सिन्नर या तालुक्यांना रविवारी गारपिटीचा फटका बसला.गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिके,भाजीपाल्यांसह द्राक्ष,डाळिंब,पपई,केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.आज,सोमवारी पश्चिम विदर्भात गारपिटीचा,तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांमध्ये झाली गारपीट

नाशिक जिल्ह्यातील चांदवड,निफाड, येवला, सिन्नर या चार तालुक्यांना आणि पुण्यातील आंबेगाव आणि नगरमधील पारनेर तालुक्याला गारपिटीचा फटका बसला आहे. गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू,ज्वारी,हरभरा,करडई पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्ष,डाळिंब,पपई,केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.आंबेगावमध्ये गारांचा खच पडला होता.नाशिकमध्ये गारपिटीसह संततधार सुरू होती.पावसामुळे द्राक्षबागांमध्ये फळकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे.डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.पपई आणि केळीला गारांचा फटका बसल्याने पिके खराब झाली आहेत.

सातारा आणि परिसरात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला.सातारा शहरासह वाई,जावळी,महाबळेश्वर, पाचगणी व उत्तर साताऱ्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला.या पावसाने सातारा शहरात सर्वत्र पाणी साचले होते.अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.सध्या भाताची काढणी सुरू असून,काढून ठेवलेला भात भिजल्यामुळे तो काळा पडण्याचा धोका आहे.वाई आणि महाबळेश्वर परिसरातील स्ट्रॉबेरी पिकाचेही नुकसान झाले.रविवारी कोकण,कोल्हापूर,सांगली,सातारा, नगर,नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

हे पण वाचा:- महाराष्ट्र राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज!

रब्बीसाठी पाऊस पोषक

गारपीट आणि अवकाळी पाऊस द्राक्ष,डाळिंब,पपई,केळी, पेरू स्ट्रॉबेरी या फळपिकांसाठी नुकसानकारक आहे. राज्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्यामुळे मोठ्या नुकसानीची भीती आहे.पण, हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा,करडई पिकांच्या वाढीसाठी पोषक स्थिती निर्माण होणार आहे.पाण्याअभावी अडचणीत आलेल्या कोरडवाहू पिकांना संजीवनी मिळणार आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा
Havaman Andaj Today

आज २६ नोव्हेंबर रोजी नाशिक,नगर आणि पुणे जिल्ह्यात गारपीट झाल्याने हवामान विभागाने राज्यातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.या मध्ये पालघर, ठाणे,रायगड,जळगाव,नाशिक ,नगर ,कोल्हापूर,सातारा,सांगली,सोलापूर,छत्रपतीसंभाजीनगर,जालना,परभणी,बीड,हिंगोली,नांदेड,अमरावती,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,नागपूर,वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Havaman Andaj Today

हवामान विभागाने महाराष्ट्रातील अकोला,बुलढाणा,आणि वाशिम जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment